• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

dry Salted surmai fish curry – खाऱ्या सुरमाईचे आंबट

साहित्य – सुकवलेल्या खाऱ्या सुरमाईचे ९ ते १० तुकडे, २ मोठे कांदे पात्तळ चिरलेले, २ tbl spn आले लसूण आणि मिरची पेस्ट, एक वाटी मध्यम काप केलेलं टोमॅटो, २ tbl spn चिंचेचा कोळ, एक चमचा हळद, ३ tbl spn  सिक्रेट कोळी मसाला, २ मध्यम काप केलेली वांगी, २ tbl spn तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवी नुसार मीठ (पर्यायी).

कृती – सर्व प्रथम कोमट पाणी करून एका बाउल मध्ये खाऱ्या सुरमईचे तुकडे टाकावेत. आणि या कोमट पाण्या मध्ये किमान २ – ३ वेळा हे सर्व सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. सुरमई स्वच्छ धुवून झाल्यावर त्यांना कोरडे करून एका प्लेट मध्ये काढून घ्यावेत. एका पातेल्यात किंव्हा कढईत ३ tbl spn चमचे तेल घेऊन चांगले तापवून घ्यावेत. तेल चांगले तापल्यावर यात पात्तळ चिरलेला कांदा टाकावा. कांदा या तेलात लालसर रंगापर्यंत तळून घ्यावा. कांदा तळून झाल्यावर यात  आले, लसूण आणि मिरची पेस्ट टाकावी, हळद टाकावी,  सिक्रेट कोळी मसाला टाकावा. मसाला यात चांगला परतून घ्यावा. मसाला परतून झाल्यावर यात आता काप केलेली वांगी टाकावीत. काप केलेले टोमॅटो टाकावेत. वांगी आणि टोमॅटो या मसाल्यात चांगले एकजीव करून घ्यावेत. सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यावर यात खाऱ्या सुरमईचे तुकडे टाकावेत. आता सुरमई देखील या मिश्रणात चांगली घोळून घ्यावी. सुरमई मिश्रणात घोळून झाल्यावर यात साध्या किंव्हा कोमट पाण्याचा वापर करून किमान २ मोठे ग्लास पाणी टाकावे. आता सर्व मिश्रण चांगले घोळून घ्यावे. जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित ब्लेंड होतील. आता या आंबटाला (curry) एक उकळी काढावी. उकळी निघे पर्यंत एका बाजूला आपण एका वाटीत २ चमचे चिंचेचा कोळ टाकून त्यात सोबत २ चमचे तांदळाचे पीठ टाकावे. आणि त्यात थोडे पाणी टाकून चांगले मिक्स करून घ्यावेत. आता आपल्या आंबटाला छान उकळी आली असेल. यात आता आपण जे पिठाचे आणि चिंचेच्या कोळाचे मिश्रण बनविले आहे ते यात टाकावे. चिंचेचा कोळ हा २ tbl spn पेक्षा जास्त घेऊ नये . कारण आपण यात टोमॅटो सुद्धा वापरली आहेत. नाहीतर आपल्या आंबटाला जास्त आंबटपणा येण्याची शक्यता आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. चवीनुसार मीठ. एक गोष्ट लक्षात ठेवा हि खारी मासळी असल्यामुळे पहिल्यापासून हिचा खारटपणा यात उतरलेला असतो. त्यामुळे रस्सा चाखून पहा आणि आवश्यकता वाटलीच तरच मीठ टाकावे. नाहीतर नाही मीठ टाकले तरी चालेल. आता १५ मिनिटे चांगली उकळ काढावी. उकळी आल्यावर १५ मिनिटानंतर गॅस बंद करावा आणि खाऱ्या सुरमईचे आंबट गरमागरम वाढून घ्यावे.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *